प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग-१

कसं सुरुवात करावं हेच कळत न्हवतं म्हणून बरीच वर्ष मी लिहिण्यासाठी टाळाटाळ करत होतो. आपल्या लेखणीला दाद मिळेल की नाही ह्या प्रश्नावरच अडकुन राहिलो होतो. मनामध्ये खुप प्रबळ इच्छा होती पण नियती काय साथ देत न्हवती. अखेर तो क्षण आज आलाच. 

आता मी नेमकं लिहणार काय आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो. प्रत्येक पदवी धारकाला १०वी ते १२वी ह्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या काटेरी मार्गावरुन प्रवास करावाच लागतो. ह्या टप्प्यातून जो कोणी पार पडेल त्याचा आयुष्याचा प्रवास सुखकर होईल असं म्हणालं तर वावगं ठरणार नाही. बालिश बुद्धी ते Maturity चा मधला काळ म्हणजे १०वी-१२वीचा काळ. ह्या वयात कळत पण नाही आणि वळत पण नाही. खरं अभ्यास करण्याचं हीच ती वेळ असते पण आपण इथेच तर चुकतो. १०वीची परीक्षा दिली की आपल्याला असं वाटतं की आपण खुप काही मिळवलं पण हीच तर आपली मोठी चूक ठरते. इथूनच आपल्या आयुष्याची दिशा बदलते हे मात्र आपण विसरतो. १०वीचे ते फुगीर गुणच आपलं घात करतात. आपल्या त्या फुगीर गुणांवर आपल्या बरोबरच आपल्या पालकांचा सुद्धा एवढा विश्वास बसतो की जणू माझं पोरचं भविष्यात 'आदर्श विद्यार्थी' हा किताबच मिळवतो की काय? 
असो.
हा मार्ग अभ्यास करणाऱ्यांसाठी 'Golden Opportunity' आहे तर जे अभ्यास करत नाही त्यांसाठी आयुष्यातली मोठी संधी गमवल्यासारखच आहे.

मनोरंजन, महत्वाच्या गोष्टी, चुका ज्या आपण केल्या आणि बरंच काही माझ्या लेखणीद्वारे तुमच्या परत पोहोचवणे हाच माझा मुख्य उद्देश्य. 

क्रमशः

Comments

  1. खुप सुंदर अमेय.अगदी बरोबर विचार मांडले आहेत.खुप छान.

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद आदित्य भाऊ😘

      Delete
  2. Congratulations💐! You dare to write on one of the most intrinsic & sensitive subject of today's generation ! Excelsior writing😊..A lot wishes !!

    ReplyDelete
    Replies
    1. Heartily thanks Shubham. You are one of the most important person in ma Life and you encouraged to write it up.
      Thanq so much😘

      Delete
  3. Khup Chan lihilas amey...👌👌

    ReplyDelete
  4. Dada mstch,....👌👌👌Well done👍

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनुश्री💞😘😘

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रवास - ९०% ते ५०% चा

प्रवास - ९०% ते ५०% चा

प्रवास - ९०% ते ५०% चा