Posts

प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग - ५ ( Shantiniketan Days ) १०वीच्या बोर्डचे पेपर जवळ येत होते. सर्वानी Score करायचं असं मनोमन निश्चय केला होता. शेवटच्या महिन्यात प्रत्येकाचा चेहरा खुप गंभीर झाला होता. प्रत्येकाचा गुणसूत्र जर पडताळून पहिलं असतं तर फक्त त्यात तुम्हाला अभ्यासचेच गुणसूत्र मिळाले असते. आमचा इतका अभ्यास झाला होता की कोणाला कोणत्या पानावर कोणता प्रश्न व उत्तर आहे हे माहित होतं. इंग्रजी शिकवायला आम्हाला B. T. Shinde सर होते. लहानपणापासून इंग्रजी माध्यमला होतो पण गेल्या ९ वर्षात जेवढं इंग्रजी येत न्हवतं तेवढं १०वीच्या वर्षात शिकलो होतो. Grammer ह्या शब्दाने आमच्या अंगावर काटा यायचा पण Shinde सरांनी आम्हाला इतका छान समजावलं होतं की मी ते आज ही विसरु शकलो नाही. खरं तर इंग्रजी इतकं सोपं जाणे त्यामागे सरांचा खुप मोठा वाटा होताच व तितकीच आमची सहनशीलता. सहनशीलता ह्यासाठी शब्द वापरला कारण थंडीच्या दिवसात भल्या पहाटे ५.३० वाजता जेव्हा अजुन कोंबडा ही आरवलेला नसायचा तेव्हा आमच्या शर्टच्या आत -२० डिग्री सेल्सियस मध्ये ठेवलेला बर्फाचा गोळा व ठंडगार पाणी पाठीवरुन गेल्यावर आमच्याच आरवण्याने कोंबड्याला जाग यायची. याच

प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग - ४   ( Shantiniketan Days ) सायंकाळी व्यायाम झाल्यावर ७ ते ९ आम्हाला परत अभ्यासासाठी वर्गात जावं लागे. पहिला तास अभ्यास होत होता मात्र त्यानंतर शेवटचा तास मेस मध्ये आज काय जेवायलं असेल याचेच वेध लागलेलं असे. चातक पक्षी ज्याप्रमाणे पाऊसचे वाट बघत असे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा कधी एकदा सुटका होते अन् मेस मध्ये कधी जायला मिळतंय याचीच वाट बघत असे. ९ वाजले रे वाजले आमच्या वर्गाची रांग मेसकडे रवाना व्हायची. आधीच पोटात कावळे ओरडत असत आणि त्यात मेस मध्ये खुप गर्दी असल्याने आम्हाला थोडा वेळ बाहेर थांबवावं लागे. आमच्या आधी ५वी ते ९चे वर्ग सुटलेले असल्या कारणाने आम्हाला नाइलाजास्तव बाहेर थांबण्याशिवाय पर्याय नसे. बाहेर थांबुन आमचं काहीतरी उद्द्योग चाललेलं असे. कोणाला डोक्यात टपली मारणे व हळूच खाली बसणे, कोणाची तर टिंगल करने, समोरच्याला धकलणे व आपण त्या दोघांची भांडणे बघत बसणे हे नित्याचेच झाले होते. कसेबसे जेवण करून होस्टेलवर यायचो व Rectorने शिट्टी मारली की प्रत्येक रूम मधील लाईट बंद व्हायची. आमची प्रत्येक Activity ( क्रियाकलाप ) ही फक्त त्या शिट्टी व वेळेवर ठरलेली असत. दिवसभराच्या थ

प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग - ३ ( Shantiniketan Days ) १०वीच्या परीक्षेला आता फक्त ६ महिने राहिले होते. सर्व विषयांचा अभ्यास पूर्ण झाला होता. आता फक्त परीक्षेची वाट होतो. ह्यावेळी मात्र फक्त अभ्यास न त्यात काहीतरी नवीन ( Creative ) करूया असं मनात आलं व त्यावर प्रयोग चालू केलं. Notes काढायला चालू केलं. आखिव तावावर पूर्ण एका विषयाचा Notes लिहल्या.  अतिशय काटेकोरपद्धतीने Notes काढल्या होत्या. धड्यांतील एक पॉइंट हे फक्त ४-५ मुख्य शब्दात लिहावं यावर माझा मुख्य जोर होता. पाठांतर, नुसता लिहून काढणे किंवा पुस्तकी किडा होण्यापेक्षा मला Linking करून अभ्यास करणे, समजून घेणे यात रस वाटत. माझ्यामते दुपारी फक्त वाचण्यापेक्षा Notes काढणे, लिहणे व स्वतःला झोपण्यापासून परावृत्त करणे उत्तम ठरते. दुपारच्या सत्रानंतर संध्याकाळी ५ला चहापानाची वेळ व्हायची. चहाची सवय नसल्यामुळे फक्त मी biscuit घेऊन बाजूला व्हायचो. त्यानंतर Sportsला जायला बंधनकारक असायचं व तसंही व्यायाम शरीराला चांगला असतोच. माझा आवडता गेम रायफल शूटिंग होतं. यातून मला दोन गोष्टी मिळत गेल्या पहिली म्हणजे मला लहानपणीपासून रायफल शूटिंगबद्दल खुप वेड होते व दूसर

प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग - २    ( Shantiniketan Days ) अखेर तो क्षण आज आलाच. माझ्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बहुतांश लोकांना, मित्रांना मी हे लिहू शकतो हे मात्र पटलं नाही. त्यांना माझी दूसरी बाजू बघून नक्कीच समाधान झाले असेल, पण मला मात्र यात आश्चर्यासारखं काहीच वाटलं नाही. चला तर मग सुरुवात करूयात. १०चे ते भयाण वर्ष असं 'टाईमपास' चित्रपटातल्या  संभाषाणांप्रमाणे थोडं भीत-भीतचं मी त्या रममाण विश्वात उडी टाकली. १०वीला मी शांतिनिकेतन,सांगली इथे होतो. १०वीचा बऱ्यापैकी अभ्यासक्रम हा ९वीत असतानाच शिकवून पूर्ण झाला होता. १०वीचा संपूर्ण वर्ष आता फक्त तेच ६ पुस्तके वाचायला लागणार होते. इथेच खरं तर माझा खुप हिरेमोड झाला होता. लहानपणीपासून वाचण्याची प्रचंड आवड. काय करावं हे सूचत न्हवत. सकाळी ६ ते ८, ९ ते दुपार १, परत २ ते ५ व ७ ते ९ फक्त अभ्यास एके अभ्यास. एकच विषयाचा  अभ्यास १० दिवस करावे लागे व शेवटच्या दिवशी केलेल्या अभ्यासावर परीक्षा ( अभ्यास कुठले ओ नुसता दंगा, टवाळकी ). असं करत १०वीच्या वर्षातले ६ महिने कसेबसे संपले. कुठे तर आपलं चुकतंय हे कळत होता प

प्रवास - ९०% ते ५०% चा

भाग-१ कसं सुरुवात करावं हेच कळत न्हवतं म्हणून बरीच वर्ष मी लिहिण्यासाठी टाळाटाळ करत होतो. आपल्या लेखणीला दाद मिळेल की नाही ह्या प्रश्नावरच अडकुन राहिलो होतो. मनामध्ये खुप प्रबळ इच्छा होती पण नियती काय साथ देत न्हवती. अखेर तो क्षण आज आलाच.  आता मी नेमकं लिहणार काय आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो. प्रत्येक पदवी धारकाला १०वी ते १२वी ह्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या काटेरी मार्गावरुन प्रवास करावाच लागतो. ह्या टप्प्यातून जो कोणी पार पडेल त्याचा आयुष्याचा प्रवास सुखकर होईल असं म्हणालं तर वावगं ठरणार नाही. बालिश बुद्धी ते Maturity चा मधला काळ म्हणजे १०वी-१२वीचा काळ. ह्या वयात कळत पण नाही आणि वळत पण नाही. खरं अभ्यास करण्याचं हीच ती वेळ असते पण आपण इथेच तर चुकतो. १०वीची परीक्षा दिली की आपल्याला असं वाटतं की आपण खुप काही मिळवलं पण हीच तर आपली मोठी चूक ठरते. इथूनच आपल्या आयुष्याची दिशा बदलते हे मात्र आपण विसरतो. १०वीचे ते फुगीर गुणच आपलं घात करतात. आपल्या त्या फुगीर गुणांवर आपल्या बरोबरच आपल्या पालकांचा सुद्धा एवढा विश्वास बसतो की जणू माझं पोरचं भविष्यात 'आदर्श विद्यार्थी' हा किताबच मिळव